धुळे अजिंक्य योद्धा न्यूज नेटवर्क
धुळे तालुक्यातील देऊर बु. येथे ढगफुटी सदृश्य वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करुन अहवाल त्वरीत शासनाला सादर करावा अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली असून झालेल्या नुकसानीचा पूर्ण मोबदला मिळवून देण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले .दरम्यान शेतकर्यांनी नुकसानीने घाबरुन न जाता मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असून भरपाई मिळवून देण्याची पूर्ण जबाबदारी माझी असल्याचेही आ.पाटील यांनी सांगीतले. देऊर आणि परिसरातील शेतकर्यांना खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव आणि आमदार कुणाल पाटील यांनी दिलासा दिला.
धुळे तालुक्यातील देऊर बु. येथील शेतशिवारात वादळी वार्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसात शेतकर्यांसह ग्रामस्थांचे तब्बल एक कोटीपेक्षा अधिक रक्कमेचे नुकसान झाले. सदर नुकसानीची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील आणि नवनिर्वाचित खासदार डॉ.शोभाताई बच्छाव यांनी आज संयुक्त पहाणी केली. धुळे तालुक्यातील उमराड नाला शेती शिवारात वादळी वार्यासह पाऊस झाला. बहूसंख्य शेतकर्यांच्या कांदा चाळीत पाणी शिरल्याने कांद्याचेही नुकसान झाले. पोल्टी फार्मवर झाड कोसळल्याने व पत्रे उडाल्याने तसेच कानठळ्या बसविणार्या विजांच्या आवाजाच्या भितीपोटी हजारो कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. त्याच प्रमाणे वादळी पावसामुळे विज तारा तुडल्या तर विजेचे पोल कोसळले. त्यामुळे शेती व गावातील विजवितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमंडून पडली आहे. या सर्व नुकसानीची आ.कुणाल पाटील आणि खा.शोभाताई बच्छाव यांनी प्रत्यक्ष नुकसानीच्या ठिकाणी जाऊन पहाणी केली. यावेळी आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, वादळी पावसामुळे शेतकर्यांची प्रचंड हानी झाली असून या भागात अत्यंत भयावह परिस्थिती आहे. नुकसानीची तातडीने पंचनामा करुन शासनाकडे अहवाल त्वरीत पाठवावा अशी मागणी केली असून त्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. त्याचप्रमाणे वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांशी चर्चा करुन विद्युत पुरवठा तत्काळ सुरळीत करण्याच्याच्याही सूचना दिल्या आहेत. दरम्यान वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा शंभर टक्के मोदबला मिळावा म्हणून दि.27 जूनपासून सुरु होणार्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले. शेतकर्यांनी वादळी पावसात झालेल्या नुकसानीने घाबरुन न जाता मी खंबीरपणे शेतकर्यांसोबत उभा आहे. शेतकर्यांना भरपाई मिळवून देणे ही माझी जबाबदारी असल्याचेही आ. पाटील यांनी सांगितले. पहाणी दरम्यान खा.शोभाताई बच्छाव आणि आ.कुणाल पाटील यांनी शेतकर्यांना दिलासा दिला. यावेळी त्यांच्यासोबत सरपंच भाऊसाहेब देवरे,डॉ.विजय देवरे,आनंदा शेवाळे,डॉ.दिनेश बच्छाव, बाबाजी देवरे, जि.प.सदस्य अरुण पाटील, चि.रायबा कुणाल पाटील, किशोर देवरे, नवल पारधी, तुषार देवरे,माजी सरपंच डिगंबर देवरे,रितेश ठाकूर, श्रावण देवरे, किरण शेवाळे,श्रावण शिदे, सुभाष देवरे, पंकज खैरनार, विक्की देवरे, कैलास नेरकर, अमोल शेवाळे, अक्षय साळुंके,मंडळाधिकारी सदाशिव सुर्यवंशी, तलाठी दिनेश दाभाडे, कृषी सहाय्यक किरण देवरे, सुनिल देवरे, लक्ष्मण माळी, पो.पा.सागर भदाणे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय बोरसे आदी उपस्थित होते.