• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Saturday, May 24, 2025
Ajinkya Yodha
  • Login
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • विचार विश्व
  • संपादकीय
  • राज्य
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • ईपेपर
  • Live Streaming
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • विचार विश्व
  • संपादकीय
  • राज्य
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • ईपेपर
  • Live Streaming
No Result
View All Result
Ajinkya Yodha
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • विचार विश्व
  • संपादकीय
  • राज्य
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • ईपेपर
  • Live Streaming
Home राजकारण

दलबदलू नेते देशाचे काय भले करतील

धुळ्यात काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

ajinkyayodha by ajinkyayodha
11/04/2025
in राजकारण
0
दलबदलू नेते देशाचे काय भले करतील

Oplus_0

Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

धुळे अजिंक्य योद्धा न्यूज नेटवर्क

भारतीय जनता पार्टीचे नेते वेगवेगळ्या राज्यात निवडून आलेले सरकार पाडण्याचे काम करतात .त्यांच्याकडे ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या चौकशीची चावी आहेत .देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे या चाव्या आहेत. नेत्यांच्या मागे चौकशा लावून ते सरकार पाडतात. पण आपल्या पक्षातून पळून गेलेले नेते देशाचे भले करणार नाही. त्यांना ऑयडियालाजी आणि विचार नसतांना ते देश आणि राज्याचे काय भले करणार, असा प्रश्न काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज केले.

धुळे लोकसभेतील शिंदखेडा येथे आज महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सचिव रमेश चेन्नीथला, कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, उमेदवार डॉ शोभा बच्छाव, माजी आमदार अनिल गोटे, राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे ,माजी आमदार रामकृष्ण पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महेश मिस्त्री, हेमंत साळुंखे, राष्ट्रवादीचे संदीप बेडसे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवराज करणकाळ, आदिवासी आघाडीच्या प्रतिभाताई शिंदे, आदिवासी संघटनेचे शिवाजीराव ढवळे, माजी मंत्री अनिस अहमद, माजी खासदार बापू चौरे ,जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना खरगे यांनी भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ही निवडणूक महत्त्वाची आहे. देशाचे भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकीत प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. या देशातील संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहिले पाहिजे. या देशात संविधान नसेल तर कुणीही सुरक्षित राहू शकत नाही .जनतेकडे मतदानाचा अधिकार आहे. या मतदानातून सत्ता मिळते म्हणूनच नेते तुमच्या दाराशी येतात. मतदानाच्या या महत्त्वाच्या माध्यमातून आपण लोकशाही टिकवण्यासाठी पुढे आले पाहिजे .महाराष्ट्र ही समाजसुधारकांची भूमी आहे. या समाजसुधारकांनी देशासह जगाला मार्गदर्शक ठरेल, असे कार्य केलेले आहेत. त्यांचे कार्य टिकवण्याची जबाबदारी आज प्रत्येकाची आहे .या समाज सुधारकांनी गुलामगिरी नष्ट करण्यासाठी बलिदान केले. पुढील काळात गुलामगिरीत जायचे नसेल तर परिवर्तना बरोबर जनतेला राहावे लागेल. भारतीय जनता पार्टीला मतदान केल्यास लोकशाही धोक्यात येऊन पुढील पिढी गुलामगिरीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा टोला देखील त्यांनी लावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पक्षाला 400 पार जागा मिळतील ,असे सांगतात. मात्र ते एकट्याच्या बळावर असे सांगू शकत नाही. कारण कोणताही लोकप्रतिनिधी आणि पक्षाला यश देण्याचे अधिकार या देशातील मतदारांना आहे. जनता ठरवतील तोच पक्ष विजयी होऊ शकतो. 400 पार जागा म्हणजे ही काही मोदीची गॅरंटी नव्हे ,असा टोला देखील त्यांनी लावला. या देशाच्या विकासात शेतकऱ्यांचा फार मोठा हातभार आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या फर्टीलायझरवर कर लावतात. तर शेती करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीचे दर वाढवतात. दुसऱ्या बाजूला शेतीमालाला भाव देत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत येतो आहे. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी अडचणीत आणण्याचे काम मोदी यांनी केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला .

भारतीय जनता पार्टी कडून काँग्रेसने 70 वर्षात काय केले असा आरोप केला जातो. पण आम्ही काहीच केले नसते तर तुम्हाला पंतप्रधान होताच आले नसते .आम्ही देश सुरक्षित ठेवला. पाकिस्तान तोडून बांगलादेशची निर्मिती केली. पण तुम्ही पहाड खोदून त्यातून उंदीर काढतात. आणि त्याचा प्रचार करतात, असा टोला देखील त्यांनी लावला. भारतात भारतीय जनता पार्टी दडपशाही करते. आता पावेतो सुमारे 800 नेत्यांच्या मागे वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करून त्यांना जेलमध्ये टाकले जाते .शरण येणाऱ्यांना मात्र पायघड्या टाकल्या जातात. पण महाराष्ट्र हा शूरांचे राज्य आहे. त्यामुळे आपला स्वाभिमान गहाण टाकून भाजपा समोर शरणागती पत्करणे योग्य नाही, असे देखील त्यांनी सांगितले.

Previous Post

सेवा आणि समर्पण भावनेतून महाविकास आघाडीची जनसेवा

Next Post

काँग्रेसची गरीबी हटाव म्हणजे कार्यकर्त्यांची रोजगार हमी

Related Posts

बांगलादेशची अस्थिरता, भारताच्या भूमिकेकडे लक्ष

बांगलादेशची अस्थिरता, भारताच्या भूमिकेकडे लक्ष

11/04/2025
धुळे खरेदी विक्री संघात  जवाहर पॅनलचा विजय

धुळे खरेदी विक्री संघात जवाहर पॅनलचा विजय

11/04/2025
धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांचा बांधकाम विभागाला आंदोलनाचा दणका

धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांचा बांधकाम विभागाला आंदोलनाचा दणका

11/04/2025
तरुणांना उध्वस्त करणाऱ्या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांचे बॉण्ड घेणाऱ्यांना जाब विचारा

तरुणांना उध्वस्त करणाऱ्या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांचे बॉण्ड घेणाऱ्यांना जाब विचारा

11/04/2025
काँग्रेसची गरीबी हटाव म्हणजे कार्यकर्त्यांची रोजगार हमी

काँग्रेसची गरीबी हटाव म्हणजे कार्यकर्त्यांची रोजगार हमी

11/04/2025
सेवा आणि समर्पण भावनेतून महाविकास आघाडीची जनसेवा

सेवा आणि समर्पण भावनेतून महाविकास आघाडीची जनसेवा

11/04/2025
Next Post
काँग्रेसची गरीबी हटाव म्हणजे कार्यकर्त्यांची रोजगार हमी

काँग्रेसची गरीबी हटाव म्हणजे कार्यकर्त्यांची रोजगार हमी

ADVERTISEMENT

ताज्या घडामोडी

पुतळ्याचे सदोष काम  करणारे झारीतील शुक्राचार्य कोण

पुतळ्याचे सदोष काम करणारे झारीतील शुक्राचार्य कोण

11/04/2025
बदलापूर मधील आंदोलन  म्हणजे जनतेचा उद्रेक

बदलापूर मधील आंदोलन म्हणजे जनतेचा उद्रेक

11/04/2025
जुलमी ब्रिटिश राज्य सत्तेला हादरा देणारा क्रांती दिनाचा संघर्ष

जुलमी ब्रिटिश राज्य सत्तेला हादरा देणारा क्रांती दिनाचा संघर्ष

11/04/2025
बांगलादेशची अस्थिरता, भारताच्या भूमिकेकडे लक्ष

बांगलादेशची अस्थिरता, भारताच्या भूमिकेकडे लक्ष

11/04/2025
“मै शकील दिल का हूँ तर्जुमान, ..…”

“मै शकील दिल का हूँ तर्जुमान, ..…”

11/04/2025
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे : जागतिक स्तरावरील साहित्यिक

साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे : जागतिक स्तरावरील साहित्यिक

11/04/2025

सर्वाधिक पसंतीचे

  • जगात निर्वासितांचा प्रश्न चिंताजनक

    जगात निर्वासितांचा प्रश्न चिंताजनक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्वातंत्र्या नंतरचा मतदानाचा अभिनव प्रयोग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या फ्रान्सच्या समुद्रातील उडीने ब्रिटिश सत्तेला हादरा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना खासदार डॉक्टर शोभा बच्छाव आणि कुणाल पाटलांकडून धीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सामाजिक समतेचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज

    0 shares
    Share 0 Tweet 0

About Ajinkya Yodha

Ajinkya Yodha News Portal websites typically cover a wide range of news topics, including local and national news, as well as Educational, sports, entertainment, Crime, politics, business, and culture, etc.

Site Visitors:

Browse by Category

  • आरोग्य
  • कृषी
  • मनोरंजन
  • राजकारण
  • राज्य
  • विचार विश्व
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Recent News

पुतळ्याचे सदोष काम  करणारे झारीतील शुक्राचार्य कोण

पुतळ्याचे सदोष काम करणारे झारीतील शुक्राचार्य कोण

11/04/2025
बदलापूर मधील आंदोलन  म्हणजे जनतेचा उद्रेक

बदलापूर मधील आंदोलन म्हणजे जनतेचा उद्रेक

11/04/2025
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

Copyright © 2024 Ajinkya Yodha| News Portal developed by JC Techsoft Solution.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • विचार विश्व
  • संपादकीय
  • राज्य
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • ईपेपर
  • Live Streaming

Copyright © 2024 Ajinkya Yodha| News Portal developed by JC Techsoft Solution.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group