• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Saturday, May 24, 2025
Ajinkya Yodha
  • Login
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • विचार विश्व
  • संपादकीय
  • राज्य
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • ईपेपर
  • Live Streaming
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • विचार विश्व
  • संपादकीय
  • राज्य
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • ईपेपर
  • Live Streaming
No Result
View All Result
Ajinkya Yodha
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • विचार विश्व
  • संपादकीय
  • राज्य
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • ईपेपर
  • Live Streaming
Home राजकारण

काँग्रेसची गरीबी हटाव म्हणजे कार्यकर्त्यांची रोजगार हमी

भाजपाचे नेते नितीन गडकरी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

ajinkyayodha by ajinkyayodha
11/04/2025
in राजकारण
0
काँग्रेसची गरीबी हटाव म्हणजे कार्यकर्त्यांची रोजगार हमी

Oplus_131072

Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

धुळे अजिंक्य योद्धा न्यूज नेटवर्क

काँग्रेसच्या घोषणेने जनतेची गरीबी हटली नाही. पण काँग्रेसच्या चेल्या चपाट्यांची गरिबी हटली. शिक्षकांच्या वेतनामध्ये देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डल्ला मारण्याचे काम केले. काँग्रेसने त्यांच्या साठ वर्षाच्या सत्ता काळात एक पाव डटाव, आणि गरीबी हटाव, या उक्तीप्रमाणे काम केले.काँग्रेसची गरीबी हटाव म्हणजे अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही ,यातून गावात रोजगार हमी अशी असल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघातील शिंदखेडा येथे आज महायुतीच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,लोकसभेचे समन्वयक तथा राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्यासह आमदार जयकुमार रावल ,आमदार मंगेश चव्हाण ,आमदार काशीराम पावरा, डॉक्टर राजेंद्र फडके, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे ,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धरती देवरे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, जिल्हा परिषदेच्या सदस्य संजीवनी सिसोदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती .या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर टीका केली. या देशातील शेतकरी अन्नदाता आहे. पण भारतीय जनता पार्टीने त्यांना ऊर्जादाता बनवण्यासाठी काम केले आहे. आता उसाच्या मळीपासून इथेनॉल तयार करण्याचे प्रकल्प उभे राहत आहे. या माध्यमातून 300 पेट्रोल पंप उभे राहणार असून याचा सरासरी विचार केल्यास 25 रुपये लिटर पेट्रोल याप्रमाणे सर्वांनाच त्याचा फायदा होईल. चार चाकी गाड्या इथेनॉल वर चालतील. तर शेतात ड्रोन च्या माध्यमातून फवारणी होणार आहे. युरिया सुफला फवारण्याची गरज पडणार नाही. हाताने ही खते फवारल्यामुळे केवळ 25 टक्के पिकांना त्याचा फायदा होतो 75 टक्के खत वाया जाते. मात्र नॅनो खत ड्रोन च्या माध्यमातून वापरले असता केवळ 25 टक्के वाया जाऊन 75 टक्के त्याचा फायदा होतो. एक बॉटल आणि एक बॅग या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन ते तीन हजार रुपयांची बचत होते. आमच्या सरकारने या देशातील 15000 महिला बचत गटांना ड्रोन दिले असून आता प्रत्येक गावात ड्रोन दिले जाणार आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कल्याण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे सरकार करीत आहे. पण काँग्रेस गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यास ते संविधान बदलणार आहे. अशी बिन बुडाची टीका केली जाते आहे. मात्र या देशातील संविधान कोणीही बदलू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच केशवानंद भारती या खटल्यात निर्णय देऊन घटलेचे मूलभूत तत्व कोणीही बदलू शकत नाही, हे स्पष्ट केले आहे. मात्र घटनेचा ब भाग बदलण्याचा अधिकार आहे. इंदिरा गांधी यांनी 80 वेळेस बदल करून घटनेची तोडमोड करण्याचे पाप केले आहे. आपल्या स्वार्थासाठी अशा पद्धतीने बदल करणारी काँग्रेस आता संविधान बदलण्याचा आरोप करीत आहेत,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्रपणे जल शक्ती विभाग तयार केला. प्रत्येक गावाला पिण्याचे पाणी मिळावे तसेच पुरापासून नुकसान थांबावे यासाठी गंगा कावेरी योजनेप्रमाणे योजना राबवल्या गेल्या. गोदावरी नदीपात्रातील तेराशे टीएमसी पाणी समुद्रात वाहून जाते. त्यामुळे गोदावरीचे पाणी कृष्णा नदीत, कृष्णा नदीचे पाणी पेडगर नदीत आणि पेडगर नदीचे पाणी कावेरी नदीमध्ये टाकून तामिळनाडू आणि कर्नाटक पर्यंत हे पाणी नेले. यातून या दोन राज्यांमधला पाण्याचा वाद देखील संपवण्याचे काम सरकारने केले आहे. या देशात 1970 पासून राज्या राज्यात नदीच्या पाण्यावरून वाद होते. पण आपण या विभागाचे मंत्री झाल्यानंतर 23 पैकी 17 भांडणे संपवले. या अंतर्गत संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एका खोलीत बसवून चर्चा केली. त्यामुळेच हे यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाण्याच्या विषयाला प्राथमिकता दिली गेली. येणाऱ्या काळात देखील या विषयाला अशाच पद्धतीने प्राथमिकता दिली जाणार आहे. असेही मंत्री गडकरी यांनी सांगितले.

Previous Post

दलबदलू नेते देशाचे काय भले करतील

Next Post

तरुणांना उध्वस्त करणाऱ्या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांचे बॉण्ड घेणाऱ्यांना जाब विचारा

Related Posts

बांगलादेशची अस्थिरता, भारताच्या भूमिकेकडे लक्ष

बांगलादेशची अस्थिरता, भारताच्या भूमिकेकडे लक्ष

11/04/2025
धुळे खरेदी विक्री संघात  जवाहर पॅनलचा विजय

धुळे खरेदी विक्री संघात जवाहर पॅनलचा विजय

11/04/2025
धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांचा बांधकाम विभागाला आंदोलनाचा दणका

धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांचा बांधकाम विभागाला आंदोलनाचा दणका

11/04/2025
तरुणांना उध्वस्त करणाऱ्या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांचे बॉण्ड घेणाऱ्यांना जाब विचारा

तरुणांना उध्वस्त करणाऱ्या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांचे बॉण्ड घेणाऱ्यांना जाब विचारा

11/04/2025
दलबदलू नेते देशाचे काय भले करतील

दलबदलू नेते देशाचे काय भले करतील

11/04/2025
सेवा आणि समर्पण भावनेतून महाविकास आघाडीची जनसेवा

सेवा आणि समर्पण भावनेतून महाविकास आघाडीची जनसेवा

11/04/2025
Next Post
तरुणांना उध्वस्त करणाऱ्या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांचे बॉण्ड घेणाऱ्यांना जाब विचारा

तरुणांना उध्वस्त करणाऱ्या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांचे बॉण्ड घेणाऱ्यांना जाब विचारा

ADVERTISEMENT

ताज्या घडामोडी

पुतळ्याचे सदोष काम  करणारे झारीतील शुक्राचार्य कोण

पुतळ्याचे सदोष काम करणारे झारीतील शुक्राचार्य कोण

11/04/2025
बदलापूर मधील आंदोलन  म्हणजे जनतेचा उद्रेक

बदलापूर मधील आंदोलन म्हणजे जनतेचा उद्रेक

11/04/2025
जुलमी ब्रिटिश राज्य सत्तेला हादरा देणारा क्रांती दिनाचा संघर्ष

जुलमी ब्रिटिश राज्य सत्तेला हादरा देणारा क्रांती दिनाचा संघर्ष

11/04/2025
बांगलादेशची अस्थिरता, भारताच्या भूमिकेकडे लक्ष

बांगलादेशची अस्थिरता, भारताच्या भूमिकेकडे लक्ष

11/04/2025
“मै शकील दिल का हूँ तर्जुमान, ..…”

“मै शकील दिल का हूँ तर्जुमान, ..…”

11/04/2025
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे : जागतिक स्तरावरील साहित्यिक

साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे : जागतिक स्तरावरील साहित्यिक

11/04/2025

सर्वाधिक पसंतीचे

  • जगात निर्वासितांचा प्रश्न चिंताजनक

    जगात निर्वासितांचा प्रश्न चिंताजनक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्वातंत्र्या नंतरचा मतदानाचा अभिनव प्रयोग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या फ्रान्सच्या समुद्रातील उडीने ब्रिटिश सत्तेला हादरा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना खासदार डॉक्टर शोभा बच्छाव आणि कुणाल पाटलांकडून धीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सामाजिक समतेचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज

    0 shares
    Share 0 Tweet 0

About Ajinkya Yodha

Ajinkya Yodha News Portal websites typically cover a wide range of news topics, including local and national news, as well as Educational, sports, entertainment, Crime, politics, business, and culture, etc.

Site Visitors:

Browse by Category

  • आरोग्य
  • कृषी
  • मनोरंजन
  • राजकारण
  • राज्य
  • विचार विश्व
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Recent News

पुतळ्याचे सदोष काम  करणारे झारीतील शुक्राचार्य कोण

पुतळ्याचे सदोष काम करणारे झारीतील शुक्राचार्य कोण

11/04/2025
बदलापूर मधील आंदोलन  म्हणजे जनतेचा उद्रेक

बदलापूर मधील आंदोलन म्हणजे जनतेचा उद्रेक

11/04/2025
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

Copyright © 2024 Ajinkya Yodha| News Portal developed by JC Techsoft Solution.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • विचार विश्व
  • संपादकीय
  • राज्य
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • ईपेपर
  • Live Streaming

Copyright © 2024 Ajinkya Yodha| News Portal developed by JC Techsoft Solution.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group