• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Friday, May 23, 2025
Ajinkya Yodha
  • Login
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • विचार विश्व
  • संपादकीय
  • राज्य
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • ईपेपर
  • Live Streaming
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • विचार विश्व
  • संपादकीय
  • राज्य
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • ईपेपर
  • Live Streaming
No Result
View All Result
Ajinkya Yodha
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • विचार विश्व
  • संपादकीय
  • राज्य
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • ईपेपर
  • Live Streaming
Home राजकारण

तरुणांना उध्वस्त करणाऱ्या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांचे बॉण्ड घेणाऱ्यांना जाब विचारा

राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांचे आवाहन

ajinkyayodha by ajinkyayodha
11/04/2025
in राजकारण
0
तरुणांना उध्वस्त करणाऱ्या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांचे बॉण्ड घेणाऱ्यांना जाब विचारा
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

धुळे अजिंक्य योद्धा न्यूज नेटवर्क

फ्युचर गेमिंग चालवणाऱ्या या कंपन्यांकडून 500 कोटींचे बॉण्ड घेऊन सुशिक्षित तरुणांचे भविष्य भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी धोक्यात आणले आहे. जुगारांचे जाळे पसरायला जबाबदार कोण. याचा जाब आता जनतेने भारतीय जनता पार्टीला विचारलाच पाहिजे, अशी टीका आज राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी धुळ्यात केली आहे.

इंडिया महाविकास आघाडीच्या धुळे लोकसभेच्या उमेदवार डॉ.शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खा. डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेचे धुळ्यातील इंदिरा उद्यान येथे आयोजन करण्यात आले होते. सभेला व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील, उमेदवार सौ.शोभाताई बच्छाव, माजी आमदार सुधीर तांबे, सौ. अश्विनीताई पाटील, प्रतिभा शिंदे, माजी आ. शरद पाटील, प्रथम महापौर भगवान करनकाळ, युवराज करनकाळ, महेश मिस्तरी,राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष रणजित भोसले, डॉ.दरबारसिंग गिरासे, डॉ.अनिल भामरे, आपचे जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे,निवृत्त न्यायाधीश जे.टी.देसले, डाॅ.सुशिल महाजन, नगरसेवक प्रफुल्ल पाटील, राजेंद्र खैरनार, धिरज पाटील,अरूण पाटील, हेमाताई हेमाडे, प्रशांत भदाणे, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची तोफ डागली.

छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशी घोषणा देताना नवचैतन्य येते. छत्रपती ही व्यक्ती नसून एक विचार आहे. शेतकऱ्यांच्या पिकाच्या एका देठाला देखील हात लावू नका, असा आदेश महाराजांनी दिला. पण केंद्रातल्या सरकारने कांदा निर्यात बंदी, कापूस व सोयाबीनचे भाव पाडून शेतकऱ्यांना अडचणीत आणले . महिलेची बेअदबी करणाऱ्या पाटलाचा छत्रपती शिवाजी महाराज यांनी चौरंगा केला. पण क्रीडा क्षेत्रातल्या लेकींचे शोषण करणाऱ्यांवर कारवाई न करता त्यांनाच दिल्लीच्या रस्त्यावरून खेचत नेऊन कारवाई करणारे केंद्रातले सरकार आणि त्यांची पाठराखण करणारे महाराष्ट्रातले फुटी यांच्यासोबत गेलो असतो तर छत्रपती शिवाजी महाराजांची तसेच छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना कवड्याच्या माळेला हात लावतानाही हात थरथरेल, असा विचार मनात आला. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान जपण्यासाठी आपण शेतकरी आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची पाठ राखण करणे पसंत केले नाही, असा टोला देखील कोल्हे यांनी लावला.

उत्तर भारतात गंगा यमुनेच्या मऊ मातीत वावरणाऱ्यांना सह्याद्रीच्या राकट पाषाणाची ओळख नाही. उत्तरेत प्रभू श्रीरामचंद्र आहे. मात्र दख्खनमध्ये मंदिरातला देव, गोठ्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज आहे .हा वारसा आम्ही जपतो आहे. केंद्रातल्या सरकारने दोन पक्ष फोडले. सर्वसामान्य शेतकऱ्याला आत्मभान देण्याचे काम करणारे हिंदुह्रुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पिचलेल्या शेतकऱ्याला स्वाभिमान देणारे शरद पवार यांचे पक्ष फोडले. महाराष्ट्रातून गुजरात मध्ये अनेक उद्योगधंदे पळवले गेले. अशा वेळी या महायुतीचे 200 आमदार विधानसभेमध्ये असताना त्यांनी एक शब्दही काढला नाही. या महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान झाला. त्यावेळी देखील महायुतीचे आमदार बोलले नाही. हे प्रश्न त्यांना विचारावेच लागतील .कांदा, कापूस ,सोयाबीन याविषयी मी संसदेत बोललो. त्यावेळी महाराष्ट्रातल्या महायुतीचे 39 खासदार होते. पण यापैकी एकही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू शकले नाही. केंद्रातील सरकारने सातत्याने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे खच्चीकरण करणे सुरू केलेले आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीपतीच्या समोर स्वाभिमान जागरूक ठेवल्याचे उदाहरण आहे. छत्रपतींचा विचार आपल्याला काळजात रुजवावा लागेल. फक्त जय म्हणून चालणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले.
गेल्या 70 वर्षात देशाच्या काँग्रेसच्या सत्ता काळात देशावर कर्ज 54 लाख कोटी होते. पण या दहा वर्षात हे कर्ज 205 लाख करोड पर्यंत जाऊन पोहोचले. दीडशे लाख कोटी कर्ज या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीने वाढवले. म्हणजे जन्माला येणाऱ्या बाळावर देखील दीड लाखाचे कर्ज राहील. या देशावर उत्पादनाच्या तुलनेत 81 टक्के कर्ज आहे. त्यामुळेच या देशाची अर्थव्यवस्था भविष्यात धोकेदायक पद्धतीत आहे.

तिसऱ्या टप्प्यात कमी झालेले मतदान कुणाचे याचा विचार झाला पाहिजे. 2014 मध्ये 18 ते 22 वर्षाच्या नव मतदारांना क्रांतीचे स्वप्न दाखवले गेले. जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनामुळे हा मतदार प्रभावित झाला होता .त्यामुळे त्यांनी घाईघाईने मतदान केले. पण 2024 मध्ये हा मतदार 28 ते 32 वर्षाचा झाला .त्याला यापूर्वीच्या दहा वर्षांमध्ये फसगत झाल्याचे कळाले. रोजगार मिळाला नाही आणि स्मार्ट सिटी देखील झाली नाही. त्यामुळे हा तरुण आता समंजस झाला असून तो आता विचार करूनच मतदान करेल, असा विश्वास देखील यावेळी कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

काँग्रेसची गरीबी हटाव म्हणजे कार्यकर्त्यांची रोजगार हमी

Next Post

धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांचा बांधकाम विभागाला आंदोलनाचा दणका

Related Posts

बांगलादेशची अस्थिरता, भारताच्या भूमिकेकडे लक्ष

बांगलादेशची अस्थिरता, भारताच्या भूमिकेकडे लक्ष

11/04/2025
धुळे खरेदी विक्री संघात  जवाहर पॅनलचा विजय

धुळे खरेदी विक्री संघात जवाहर पॅनलचा विजय

11/04/2025
धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांचा बांधकाम विभागाला आंदोलनाचा दणका

धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांचा बांधकाम विभागाला आंदोलनाचा दणका

11/04/2025
काँग्रेसची गरीबी हटाव म्हणजे कार्यकर्त्यांची रोजगार हमी

काँग्रेसची गरीबी हटाव म्हणजे कार्यकर्त्यांची रोजगार हमी

11/04/2025
दलबदलू नेते देशाचे काय भले करतील

दलबदलू नेते देशाचे काय भले करतील

11/04/2025
सेवा आणि समर्पण भावनेतून महाविकास आघाडीची जनसेवा

सेवा आणि समर्पण भावनेतून महाविकास आघाडीची जनसेवा

11/04/2025
Next Post
धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांचा बांधकाम विभागाला आंदोलनाचा दणका

धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांचा बांधकाम विभागाला आंदोलनाचा दणका

ADVERTISEMENT

ताज्या घडामोडी

पुतळ्याचे सदोष काम  करणारे झारीतील शुक्राचार्य कोण

पुतळ्याचे सदोष काम करणारे झारीतील शुक्राचार्य कोण

11/04/2025
बदलापूर मधील आंदोलन  म्हणजे जनतेचा उद्रेक

बदलापूर मधील आंदोलन म्हणजे जनतेचा उद्रेक

11/04/2025
जुलमी ब्रिटिश राज्य सत्तेला हादरा देणारा क्रांती दिनाचा संघर्ष

जुलमी ब्रिटिश राज्य सत्तेला हादरा देणारा क्रांती दिनाचा संघर्ष

11/04/2025
बांगलादेशची अस्थिरता, भारताच्या भूमिकेकडे लक्ष

बांगलादेशची अस्थिरता, भारताच्या भूमिकेकडे लक्ष

11/04/2025
“मै शकील दिल का हूँ तर्जुमान, ..…”

“मै शकील दिल का हूँ तर्जुमान, ..…”

11/04/2025
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे : जागतिक स्तरावरील साहित्यिक

साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे : जागतिक स्तरावरील साहित्यिक

11/04/2025

सर्वाधिक पसंतीचे

  • जगात निर्वासितांचा प्रश्न चिंताजनक

    जगात निर्वासितांचा प्रश्न चिंताजनक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्वातंत्र्या नंतरचा मतदानाचा अभिनव प्रयोग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या फ्रान्सच्या समुद्रातील उडीने ब्रिटिश सत्तेला हादरा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना खासदार डॉक्टर शोभा बच्छाव आणि कुणाल पाटलांकडून धीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सामाजिक समतेचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज

    0 shares
    Share 0 Tweet 0

About Ajinkya Yodha

Ajinkya Yodha News Portal websites typically cover a wide range of news topics, including local and national news, as well as Educational, sports, entertainment, Crime, politics, business, and culture, etc.

Site Visitors:

Browse by Category

  • आरोग्य
  • कृषी
  • मनोरंजन
  • राजकारण
  • राज्य
  • विचार विश्व
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Recent News

पुतळ्याचे सदोष काम  करणारे झारीतील शुक्राचार्य कोण

पुतळ्याचे सदोष काम करणारे झारीतील शुक्राचार्य कोण

11/04/2025
बदलापूर मधील आंदोलन  म्हणजे जनतेचा उद्रेक

बदलापूर मधील आंदोलन म्हणजे जनतेचा उद्रेक

11/04/2025
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

Copyright © 2024 Ajinkya Yodha| News Portal developed by JC Techsoft Solution.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • विचार विश्व
  • संपादकीय
  • राज्य
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • ईपेपर
  • Live Streaming

Copyright © 2024 Ajinkya Yodha| News Portal developed by JC Techsoft Solution.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group